स्वराज्याचे तोरण बांधले

प्रश्न १ रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

१.शिवरायांकडे पुणे , सुपे, चाकण व         इंदापूर      या परगण्यांची जहागीर
 होती .

२.शिवरायांनी                तोरणा       जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे,असे ठरवले .

३.स्वराज्याची पहिली राजधानी            राजगड          ही सजली.

४.शिवरायांनी तोरणा किल्ल्याल        प्रचंडगड        हे नाव दिले .

५.शिवरायांच्या जहागिरीतील किल्ले           विजापूर       दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते .

६.मुरुंबदेवाच्या किल्ल्याला शिवरायांनी     राजगड     हे नाव दिले .

प्रश्न २.एका वाक्यात उत्तरे लिहा

१.महाराष्ट्रात कोणत्या चार सत्ता हुकमत गाजवत होत्या ?
उत्तर - महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशाहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान , गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता हुकमत गाजवत होत्या .

२.शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या?
उत्तर - शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस , प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या .


३.शिवरायांनी आदिलशाहाला कोणते उत्तर पाठवले ?
उत्तर - शिवरायांनी आदिलशाहाला उत्तर पाठवले की, ' जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा ;म्हणून आम्ही किल्ला घेतला तो आदिलशाहाच्या  हितासाठीच , यात दुसरा काहीही हेतू नाही . '

४.तोरणा किल्ल्याला ' तोरणा ' हे नाव का पडले ?
उत्तर - तोरणा किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे, त्यावरून या किल्ल्याला
 'तोरणा ' हे नाव पडले .

५.राजगडानंतर शिवरायांनी कोणते किल्ले ताब्यात घेतले?
 उत्तर - राजगडानंतर शिवरायांनी कोंढाणा , पुरंदर  व रोहिडा हे किल्ले ताब्यात घेतले .

प्रश्न ३.दोन ते तीन वाक्यांत कारणे लिहा .
१.स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली .
उत्तर - तोरणा किल्ला हा एक बळकट आणि प्रचंडअसा डोंगरी किल्ला होता .आदिलशाहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते . किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी आणि दारूगोळाही नव्हता;म्हणून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ल्याची निवड केली .

२.तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या .
उत्तर - तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम चालू असताना मोहरांनी भरलेल्या चार घागरी कामगारांना सापडल्या . ' शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे , तिनेच हे धन दिले,अशी कामगारांची भावना झाली.स्वराज्याचे ते धन होते , या भावनेने कामगारांनी एकाही मोहरेला हात न लावता त्या घागरी शिवरायांजवळ मोठया आनंदाने आणून दिल्या .

Post a Comment

Previous Post Next Post