स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त 

प्रश्न १.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा
१.भोरप्या डोंगरावर शिवरायांनी       प्रतापगड       हा किल्ला बांधला .

२.खंडोजी आणि बाजी घोरपडे यांनी            कोंढाणा         भागात धुमाकूळ माजवला .

३.मोरे हे        जावळीचे          जहागीरदार होते .

४.जावळीच्या विजयाने        रायरीचा       प्रचंड किल्ला स्वराज्यात आला .

५.शिवराय              कर्तव्यापुढे                नातेगोते मानत नसत.


प्रश्न २.एका वाक्यात उत्तरे लिहा.
१.जावळीच्या मोऱ्यांना आदिलशाहाने कोणता किताब दिला होता ?
उत्तर - जावळीच्या मोऱ्यांना आदिलशाहाने 'चंद्रराव ' हा किताब दिला होता .

२.जावळीचा विजय फार महत्त्वाचा का होता ?
उत्तर - जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता; कारण या विजयामुळे  शिवरायांचे स्वराज्य पुर्वीपेक्षा दुप्पट झाले व रायरीसारखा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला .

३.शिवरायांच्या स्वराज्याला कोणते सरदार विरोध करीत होते ?
उत्तर - शिवरायांच्या स्वराज्याला निंबाळकर घोरपडे , मोरे इत्यादी सरदार विरोध करीत होते .

४.आदिलशाहाने आपल्या चाकरीतील कोणत्या सरदारांना शिवरायांविरुद्ध चिथावले ?
उत्तर - आदिलशाहाने आपल्या चाकरीतील खंडोजी आणि बाजी घोरपडे या सरदारांना शिवरायाविरूद्ध चिथावले.

५.मोऱ्यांची जहागीर कोठून कोठपर्यत होती ?
उत्तर - मोऱ्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती .

प्रश्न ३.दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा .
१.जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे ?
उत्तर - जावळीचे जंगल इतके दाट होते , की भरदिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता . या जंगलात वाघ , लांडगे , अस्वले इत्यादी श्वापदे संचार करीत.मोऱ्यांची जावळी जणू वाघाची जाळीच होती;त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे .

२ .शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले ?
उत्तर - स्वराज्याच्या मुलखावर स्वाऱ्या करणाऱ्या यशवंतराव मोरे याला शिवरायांनी पत्र धाडले की ," तुम्ही राजे म्हणाविता,राजे आम्ही . आम्हांस श्रीशंभूने राज्य दिधल आहे , तर तुम्ही राजे न म्हणावे . " 

३.यशवंतराव मोरे याने शिवरायांना कोणत्या गोष्टी देण्याचे कबूल केले ?
उत्तर - जावळीच्या गादीवर बसवण्यात शिवरायांनी केलेल्या मदतीच्या बदल्यात यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले.तसेच शिवरायांच्या कार्यात मदत करण्याचेही
 कबूल केले .

Post a Comment

Previous Post Next Post