बादशहाच्या हातावर तुरी दिल्या

प्रश्न १.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

१) शिवराय बादशाहाच्या दरबारात गेले ;त्या दिवशी औरंगजेब बादशाहाचा
             पन्नासावा      वाढदिवस होता .

२) आग्ऱ्याहून येताना सभाजीराजांना        मथुरेत              एका सुरक्षित ठिकाणी ठेवले.

३) कैदेतून निसटून शिवराय           राजगडावर         सुखरूप पोहोचले .

४) शिवराय                       जयसिंगच्या            शब्दावर विश्वास ठेवून आग्ऱ्यास बादशाहाच्या भेटीस गेले .

प्रश्न २.एका वाक्यात उत्तरे लिहा.

१ ) आग्ऱ्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला ?
उत्तर -आग्ऱ्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार आपल्या मातोश्री जिजाबाई यांच्या हाती सोपवला .

२ ) आग्ऱ्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले ?
उत्तर -आग्ऱ्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे
सेवक आणि संभाजीराजे राहिले .

३ ) आजार बरा व्हावा  ; म्हणून शिवरायांनी काय केले ?
उत्तर -आजार बरा व्हावा ;म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवावयास सुरुवात केली .

४ ) कोणते कारण सांगून हिरोजी व मदारी कैदेतून निसटले ?
उत्तर -' महाराजांचे औषध आणायला जातो,' असे सांगून मदारी व हिरोजी कैदेतून
 निसटले .

प्रश्न ३.दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

१) शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली ?
उत्तर - कैदेत शिवरायांनी आजारी असल्याचे सोंग केले .आजार बरा व्हावा ;म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली .पहारेकरी प्रथम ते पेटारे तपासून पाहत असत ; पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहीनासे झाले . ही संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजीराजे पेटाऱ्यांतून पसार झाले .

२ ) कैदेतून सुटल्यावर शिवराय व संभाजीराजे राजगडावर कसे पोहोचले ?
उत्तर -कैदेतून सुटल्यावर शिवरायांनी संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले.वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत देतशिवराय राजगडावर पोहोचले . पुढे दोन महिन्यांनी संभाजीराजेही राजगडावर सुखरूप पोहोचले .

1 Comments

Previous Post Next Post